एका धान्याच्या कणगीस एक लहानसे भोक होते. त्यातून एक अशक्त
व भुकेलेला उंदीर आंत शिरला आणि तेथे बरेच दिवस राहिला. यथेच्छ धान्य खाऊन
तो इतका धष्टपुष्ट झाला की, त्यास त्या भोकातून बाहेर पडता येईना.
एक चिचुंद्री त्याची ती धडपड पाहात बसली होती, ती त्यास म्हणाली, ‘गडया, ह्या भोकातून बाहेर पडण्यास एकच युक्ति आहे. तू पहिल्याने आत शिरलास त्यावेळी जितका बारीक होतास, तितकाच बारीक तू पुनः होशील तेव्हाच तुला या भोकातून बाहेर पडता येईल.’
तात्पर्य:- अविचाराने किंवा अधाशीपणाने मनुष्य संकटांत पडतो.
एक चिचुंद्री त्याची ती धडपड पाहात बसली होती, ती त्यास म्हणाली, ‘गडया, ह्या भोकातून बाहेर पडण्यास एकच युक्ति आहे. तू पहिल्याने आत शिरलास त्यावेळी जितका बारीक होतास, तितकाच बारीक तू पुनः होशील तेव्हाच तुला या भोकातून बाहेर पडता येईल.’
तात्पर्य:- अविचाराने किंवा अधाशीपणाने मनुष्य संकटांत पडतो.
No comments:
Post a Comment